इन्फोसिस मध्ये ५५,००० जागांची होणार भरती; IT क्षेत्रात काम करण्याची तरुणांना सुवर्णसंधी!
नवी दिल्ली : नोकरी हा लोकांसाठी खूप महत्त्वाचा उत्पन्नाचा मार्ग असतो. नोकरी करायच्या उद्देशाने अनेक तरुण शिक्षण घेतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा घटक असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये सध्या अनेक पदांसाठी भरती सुरू असून आघाडीची आयटी कंपनी असलेल्या Infosys ने ५५००० नोकऱ्यांची संधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले आहे.ग्लोबल हायरिंग अंतर्गत या नोकऱ्या उपलब्ध केल्या जाणार असून इन्फोसिस सध्या गुंतवणूक (Investment) वाढवण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे.
वाचा –
आघाडीच्या IT कंपन्यांमध्ये मध्ये सध्या एवढे लोक काम करतात
इन्फोसिस (Infosys) या कंपनीमध्ये सध्या २ लाख ९२ हजार ६७ इतके कर्मचारी काम करतात. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ३९.६ % असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय TCS मध्ये ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी व Wipro मध्ये २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत.
IT कंपन्यांनी कमावला भरपूर नफा (Profit)
कोरोनाच्या काळात देखील या IT कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला असून या कंपन्यानी आपले तिमाहीचे परिणाम (Result) नुकतेच जाहीर केले आहेत. त्यानुसार Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपये, तर Wipro ने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा (Profit) कमावला.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा