Vihir Anudan Yojana | शेतकऱ्यांना विहीरीसाठी मिळतंय 4 लाख अनुदान; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नमुना
Vihir Anudan Yojana | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते. केवळ पावसाच्या जीवावर शेती करणे शक्य नाही. शेतीसाठी पाण्याचा साठा करावा लागतो. विहिर, तलाव, नदी हा प्राण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून वापरला जातो. शेतकऱ्यांना शेती करताना विहिरींची गरज भासते. परंतु विहीर खांदने शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे का? कारण विहीर खांदण्यासाठी भरमसाठ पैसा लागतो. जो शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतो. या सर्वांचा विचार करता शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेती पडीक ठेवावी लागू नये म्हणून विहीर खांदण्यासाठी अनुदान दिले जाते. तर मग जाणून घेऊयात कोणत्या योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान मिळते आणि त्यासाठी अर्ज कसा करावा.
वाचा: शेतजमिनीचा ऑनलाईन नकाशा कसा काढायचा रे भाऊ? अरे शेतकऱ्यांसाठी आपलं ‘मी E-शेतकरी’ माहिती द्यायला आहे ना…
राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत विहिरींसाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत जवळपास 3 लाख 87 हजार विहीर खोदण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये काही बदल करून शेतकऱ्यांना 3 लाखांहून 4 लाख इतके अनुदान देण्यात येत आहे. तसेच अंतराची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने एक अर्ज सादर करावा लागेल. कोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ही माहिती जाणून घेऊयात.
लाभार्थी निवड
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती)
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- स्त्री-कर्ता असलेली कुटुंबे
- शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटूंबे
- जमीन सुधारणांचे लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थीजे) अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम २००६ (२००७ चा २) खालील लाभार्थी
- सिमांत शेतकरी (२.५ एकर पर्यंत भूधारणा)
- अल्प भूधारक (५ एकर पर्यंत भूधारणा)
पात्रता
- लाभधारकाकडे किमान ०.४० हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- महाराष्ट्र भुजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम १९९३ च्या कलम ३ नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या ५०० मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये,
- दोन सिंचन विहिरींमधील १५० मीटर अंतराची अट पुढील बाबींना लागू राहणार नाही.
- दोन सिंचन विहिरीमधील किमान १५० मीटर अंतराची अट ही Run off Zone तसेच, अनुसूचित जाती व जमाती व दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांकरिता लागू करण्यात येऊ नये.
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिर मंजूर करताना खाजगी विहिरीपासून १५० मी. अंतराची अट लागू राहणार नाही.
- लाभधारकाच्या ७/१२ वर याआधीच विहीरीची नोंद असू नये.
- लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा. (Online)
- एकापेक्षा अधिक लाभधारक संयुक्त विहीर घेऊ शकतील मात्र त्यांचे एकूण सलग जमीनीचे क्षेत्र ०.४० हेक्टर पेक्षा जास्त असावे.
- आवश्यक कागदपत्रे
- ज्या लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्डधारक असला पाहिजे.
- ७/१२ चा ऑनलाईन उतारा
- ८ अ चा ऑनलाईन उतारा
- जॉबकार्डची प्रत
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून ०.४० हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- आनंदाची बातमी! शासनामार्फत घरकुल योजनेची यादी प्रसिद्ध, ‘अशा’प्रकारे ऑनलाईन डाउनलोड करा एका क्लिकवर…
- बिग ब्रेकिंग! खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ; केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय
Web Title: Farmers getting 4 lakh subsidy for wells; Know eligibility, application process and pattern