ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याकृषी सल्ला

Agricultural Advice | वाढत्या तापमानाचा पिकाला धोका! जाणुन घ्या गहू, हरभऱ्यासह ‘या’ पिकांचाही कृषी सल्ला

Agricultural Advice | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस दिनांक 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 दरम्यान आकाशनिरभ्र ते आंशिक ढगाळ व हवामान (Weather Update) कोरडे
राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 4 दिवसामध्ये कमाल तापमान 35.6 ते 36.0 अंश
सेल्सिअस तर किमान तापमान 15.0 ते 15.4 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आद्रता 50 ते
54 टक्के तर दुपारची सापेक्ष (Agricultural Advice) आद्रता 30 ते 34 टक्के राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. कमाल
तापमान: विदर्भामध्ये पुढील 4-5 दिवसांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. किमान तापमान:
विदर्भामध्ये पुढील 4-5 दिवसांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. चला तर मग हवामान आधारित कृषी सल्ला (Agricultural Advice) काय आहे ते जाणून घेऊयात.

वाचाWheat | भारतात गव्हाचं संकट? जाणून घ्या काय आहे कारण अन् संपूर्ण गव्हाचं गणित

कृषी सल्ला

  • पुढील 4 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आणि
    इतर रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील पिकाची (Agriculture) कापणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावी.
  • उशिरा पेरणी
    केलेल्या गहू पिकास फुलोरा अवस्था (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस), दाण्याची दुधाळ अवस्था (पेरणीनंतर 80 ते 85
    दिवस), दाण्यात चिकाची अवस्था (पेरणीनंतर 95 ते 100 दिवस) मध्ये असताना ओलीत करावे.
  • हंगामी पिके,
    फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत
    करावे.
    फळबागा व भाजीपाला पिकास पीक आच्छादन करावे, जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास
    मदत होईल.
  • हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इत्यादी.) कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांची फवारणीची कामेसुरु ठेवावीत.

गहू
गहू पिकास जमिनीतील ओलावा व पिकाची गरज लक्षात घेता पिक अवस्थेनुसार फुलोरा अवस्था
(पेरणीनंतर 65 ते 70 दिवस), दाण्याची दुधाळ अवस्था (पेरणीनंतर 80 ते 85 दिवस), दाण्यात चिकाची अवस्था (पेरणीनंतर 95 ते 100 दिवस) मध्ये असताना ओलीत करावे. गहू पिकामध्ये उंदीर
व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिषाचा वापर करावा.विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धान्याचा भरडा
49 भाग, थोडे गोडे तेल व 1 भाग ब्रोमाडीओलोन 0.25% सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर आमिष
प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिलाजवळ ठेवावे.

भुईमूग
भुईमुग पिकास आवश्यकतेनुसार डवरणी व खुरपणी करून पीक साधारणतः सहा ते सात आठवड्याचे होईपर्यंत तण विरहीत ठेवावे. खांडे भरून झाल्यानंतर पिकास ओली करून नंतर पिकास ताण द्यावा यामुळे पिकास एकाचवेळी फुले येण्यास मदत होते. भुईमुग पिकास या महिन्यात पिकाची गरज व जमिनीचा मगदूरास अनुसरून 10 ते 12 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे.

वाचाSoybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मका अन् सोयाबीनचे भाव राहणार कायम? जाणून घ्या काय आहे कारण

सूर्यफूल
उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी एका ठिकाणी एकच निरोगी व तंदरुस्त रोपटे
ठेऊन विरळणी करावी. योग्य विरळणी केल्यास पिक उत्पादनात 18 ते 33 टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते. सुर्यफुल पिकास हलकी जमीन असल्यास 6 ते 8 वेळा, मध्यम जमीन असल्यास 4 ते 5 वेळा व भारी
जमीन असल्यास 3 ते 4 वेळा ओलीत करावे. सुर्यफुल पिक 45 दिवसाचे होईपर्यंत पिकाच्या आवश्यकतेनुसार कोळपणी व खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे.

हरभरा
पुढील 4 दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा पिकाची काढणी
आणि मळणी ची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Growing temperature threatens the crop! Know the agricultural advice of crops including wheat, gram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button