अवकाळी पाऊस, गारठा वन्यप्राणी यांपासून पिकांचे (crop) संरक्षण करणे हे एक शेतकऱ्यांचे कष्टाचे काम झाले आहे. यातून कित्येक शेतकऱ्यांना (farmers) वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिकांचे नुकसान होण्यापासून पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असताना पाहायला मिळते. अशाच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने अनोखा प्रयोग अजमावला आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकाला वाचवण्यासाठी भीतीदायक आवाज रेकॉर्ड करून लाऊडस्पीकरवर रात्रभर लावत असल्याची माहिती मिळाली आहे. वेगवेगळ्या आवाजाने वन्यप्राणी शेताकडे फिरकत नसल्याचे उघड झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) कष्टाचे काम कमी झाले आहे. नांदेड जिल्ह्यात रानडुकराची संख्या जास्त आहे. रात्रीचं ज्वारी, मका, गहू, हरभरा या सारख्या पिकांचे नुकसान करतात.
पीक संरक्षणाचे उपाय –
१) पिकांच्या भोवती व पिकांमध्ये विविध रंगाच्या साड्या रोवल्या जातात. याने रानडुराला कोणीतरी माणूस असल्याचा भास होतो व ते पिकांमध्ये शिरत नाही.
२) शेतात मानवी केस विस्कटून पसरल्यानंतर अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. हा प्रयोग मराठवाड्यातील शेतकरी सतत अजमावत असतात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा