ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्यानाशिक

“या” जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 238 कोटी रुपये जमा, उर्वरित निधी येत्या 15 दिवसांच्या आत जमा होणार..

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (farmers) जिल्हा बँकेच्या माध्यमातून 238 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसांच्या आत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेने (District Bank) दिली आहे. आता शेतकऱ्यांना (farmers) काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

वाचा – 2022 Budget; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, PM किसान योजनेतून दिली जाणार ८० लाख घरं..

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या (farmers) पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 424 कोटी निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाला होता. त्यापैकी गेल्या दोन महिन्यात जिल्हा बँकेकडून (district bank) 238 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. उर्वरित रक्कम येत्या 15 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहीती जिल्हा मध्यवर्ती बँकेने दिली आहे.

अतिवृष्टी सर्वात जास्त या पिकाचे नुकसान –

अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त फटका सोयाबीन पिकाला बसला होता. पावसामुळे या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादन हातात पडायच्या वेळी अतिवृष्टी झाली व पीक खराब झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट निर्माण झाली. नुकसानग्रस्त शेतकरी (farmers) अनुदानाची वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. उर्वरित रक्कम 15 दिवसांच्या आत जमा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांचा असा झाला फायदा –

सोयाबीनचे पीक वाया गेल्यामुळे पूढे शेतकऱ्यांचाच फायदा झाला. सोयाबीन पिकाची नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट निर्माण झालेली दिसुन आली. सोयाबीन कमी प्रमाणात बाजारात येत राहिल्याने शेतकऱ्यांना देखील सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button