Onion Rate | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांद्यावरील निर्यात करामुळे संतप्त शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Web Title: Good news for farmers! The government took 'this' big decision for the angry farmers due to the export tax on onion
Onion Rate | टोमॅटोनंतर आता देशभरातील मंडईंमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक मंडईंमध्ये कांद्याचे भाव 50 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 19 ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले. हे निर्यात शुल्क 31 डिसेंबर 2023 पर्यंत कांद्यावर लागू राहील. तेव्हापासून सरकारच्या या निर्णयाला कांद्याची (Onion Rate) लागवड करणारे शेतकरी विरोध करत होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
The government has taken a decision to remove the discontent of the farmers शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने घेतला निर्णय
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र सरकारने 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रतिकिलो कांदा खरेदीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांना 24 रुपये देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.
वाचा : 4 Thousand Electric Tractors Exported | “मेक इन इंडिया” ला प्रोत्साहन; भारतातील तब्बल 4 हजार ट्रॅक्टर होणार निर्यात, या दोन कंपन्यांनी केला करार…
Special procurement centers will be opened in Nashik and Ahmednagar for buying onions नाशिक आणि अहमदनगरमध्ये कांदा खरेदीसाठी विशेष खरेदी केंद्रे उघडणार
कांद्यावर लादलेल्या निर्यात शुल्काला महाराष्ट्रात सर्वाधिक विरोध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांद्याच्या मुद्द्यावर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोललो. केंद्र सरकार 2,410 रुपये प्रति क्विंटल दराने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. त्यासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात विशेष खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
Minister Dada Bhuse made a controversial statement about the price of onion मंत्री दादा भुसे यांनी कांद्याच्या दराबाबत वादग्रस्त केलं वक्तव्य
कांद्याचे वाढते दर आणि निर्यात करात वाढ यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी वादग्रस्त विधान केले आहे. दोन-चार महिने लोकांनी कांदा खाल्ला नाही, तर फारसा फरक पडणार नाही, असे ते म्हणाले. दादा भुसे म्हणाले की, जर तुम्हाला 10 लाख रुपयांचे वाहन वापरता येत असेल, तर किरकोळ दरातून 10 किंवा 20 रुपयांनी महागडा भाजीपालाही खरेदी करता येईल. ज्यांना कांदा विकत घेता येत नाही, त्यांनी दोन-चार महिने तो खाल्ला नाही तर काही फरक पडणार नाही.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा :
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे! पीएम किसान योजनेचा कुटुंबातील किती सदस्य लाभ घेऊ शकतात? जाणून घ्या नियम
- Cabinet Decision | मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! गौरी-गणपतीचे सणालाही मिळणार आनंदाचा शिधा; सविस्तर वाचा मंत्रिमंडळ निर्णय
Web Title: Good news for farmers! The government took ‘this’ big decision for the angry farmers due to the export tax on onion