Bamboo Planting | चक्क बांबूपासून होणार इथेनॉल रिफायनरीची निर्मिती, शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी दिल्या सूचना…
Bamboo Planting | लातूरमध्ये इथेनॉल रिफायनरी निर्मिती प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. इथेनॉल (ethanol) रिफायनरी निर्मिती बांबूपासून तयार करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मांजरा नदीच्या पात्रात जेवढे लोक आहे त्या भागातील शेतकऱ्यांना (farmers) बांबू लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांबूला चांगले मार्केट मिळवून देणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.
वाचा – सावधान, भारतात सर्व ठिकाणी पूढील 2 दिवस गारांसह वादळी पावसाची शक्यता…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी –
लातुरमध्ये बांबू पासून तयार करता येणार इथेनॉलची (ethenol) रिफायनरी लवकरच उभी करण्यात येणार आहे. यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. मागे लातूरमध्ये सोयाबीन (soyabean) प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली, आता लातूर सोयाबीन हब म्हणून ओळखला जाऊ लागला. तसेच आता सहकारी तत्वावर बांबूपासून तयार होणाऱ्या रिफायनरी उभारली जाणार आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल. व हा प्रकल्प लवकरच उभारला जाईल असे आश्वासन दिले आहे.
आ. अभिमन्यू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार –
अलमॅक बायोटेक ही लॅब देशात पहिली बांबू वरली टीश्यू कल्चर लॅबरोटरी लॅब आहे. ही लॅब लोदगा येथील आहे. या लॅब मध्ये एक तासात 5 हजार रोपटे तयार होतात. या लॅबरोटरीतून 150 कोटी रोप तयार करण्यात येतील असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. महत्वाचं म्हणजे पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने होणार असल्याचे देखील सांगितले.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा