ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather News | महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, काही भागात वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’!

मुंबई: राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार दिवस काही भागात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर काही भागात उन्हाचा तीव्रता वाढली आहे. राज्यातील अनेक भागात तापमान ४० अंशाच्या पुढे आहे.

हवामान विभागाने दिलेला अंदाज:

  • आज (8 एप्रिल): संपूर्ण विदर्भ तसेच मराठवड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच बीड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला आहे.
  • बुधवार (9 एप्रिल): संपूर्ण विदर्भ, मराठवड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सातारा, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाण मेघगर्जेनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
  • गुरुवार (10 एप्रिल) आणि शुक्रवार (11 एप्रिल): विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

तापमानात वाढ:

आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रायलसिमा भागातील अनंतपूर येथे देशातील सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढेच आहे. राज्यात उन्हाचा तीव्रता कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.

नागरिकांना आवाहन:

हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घ्यावी.

वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button