Weather update| महाराष्ट्राला येलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यात गारपिटीचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय; जाणून घ्या
Weather update| सूर्यदेव कोपलेले आहेत. राज्यात उकाडा प्रचंड वाढला आहे. उन्हाच्या झळा ह्या तीव्र झाल्या आहेत. बाहेर पडणंही मुश्कील झालं आहे. अशातच महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळं राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. आज (दि.13) मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात गारपीटीचा तर उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
वाचा: लूट थांबणार? दूध संकलन केंद्रांना लगाम, राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) सक्रिय
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झालं आहे. पूर्व विदर्भापासून, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. खंडित वारं वाहत
आहे. तसंच आग्नेय अरबी समुद्रात वाऱ्यांची स्थिती चक्राकार आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर ही स्थिती आहे.
राज्यातील तापमानाची स्थिती
राज्यात तापमानाचा पारा सतत वाढतच आहे. राज्यात आत्तापर्यंत चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 41.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. सोलापूर, परभणी, वर्धा, धुळे येथे पारा ४० अंशांपार पोचला होता. जळगाव, ब्रह्मपुरी येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान पोचले होते.
या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा
हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी गारपिटीचा इशारा दिला आहे. यामध्ये कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा यात समावेश आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील गारपिटीची शक्यता आहे.
वाचा: हर्षोल्हास! कापूस वधारला, शेतकरी आनंदला दरात झाली ‘इतकी’ वाढ शेतकरी संघटनेची ‘ही’ नाराजी
या जिल्ह्यांना देण्यात आला आहे येल्लो अलर्ट
मराठवाड्यातील बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, नागपूर आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली आणि कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- काळजी घ्या, जनावरांना शिळे अन्न घातल्यास होऊ शकतो ‘हा’ आजार, मृत्यूचीही असते भीती
- काय सांगता? मळणी यंत्रासाठी मिळतं अनुदान; शेतकऱ्यांनो, जाणून घ्या योजना
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..