दिवाळी झाली आता तुळशी विवाहाची घाई! जाणून घ्या कधी - मी E-शेतकरी
राशिभविष्य

Tulsi vivah |दिवाळी झाली आता तुळशी विवाहाची घाई! जाणून घ्या कधी आहे मुहूर्त आणि पूजेची पद्धत

Tulsi vivaha | आता तुळस हे विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. परंतु आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते, अशी लोकमान्यता देखील असल्याचे सांगितले जाते.

आपण देवाला तुळस अर्पण केल्याशिवाय विष्णूची केलेली पूजा ही व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगतले आहे. तसेच तुळशीची मंजिरी ही सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. आपल्याला माहीतच आहे की तुळस ही आरोग्यदृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली जाते.

तसेच तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. मग त्यामुळेच प्रत्येक घरात (House) तुळशीच्या पूजेचे फार महत्त्व आहे. तसेच तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते. तसेच तुळशी विवाह हा वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिपर्यंत तुळशी विवाह करतात. मुख्यतः द्वादशीस तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. तसेच यावर्षी तुळशी विवाह हा ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी आहे. तर मग जाणून घ्या पूजा पद्धती, मुहूर्त आणि तुळशी विवाहाचे (Wedding) महत्त्व.

वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

तर मग हा आहे तुळशी विवाह २०२२ तारीख आणि शुभ मुहूर्त

तर मग यावर्षी तुळशी विवाहाचा उत्सव हा शनिवार ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी साजरा केला जाणार आहे. तसेच पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशी म्हणजेच देवूथनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे पूर्ण चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. त्यामुळे भगवान विष्णूच्या जागरणानंतर तुळशीजींचा त्यांच्या शिलाग्राम अवताराशी विवाह करण्याची परंपरा आहे. तसेच तुळशी विवाहाची योग्यपद्धतीने व शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद मिळतो.

तुळशी विवाह तारीख – शनिवार, ०५ नोव्हेंबर २०२२कार्तिक द्वादशी तिथी शनिवार ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी ०६:०८ पासून सुरू होते. कार्तिक द्वादशी तारीख संपेल – रविवार ०६ नोव्हेंबर २०२२ संध्याकाळी ०५:०६ पर्यंत

तर मग यावेळी तुळशीविवाहाच्या या पद्धतीने पूजा करा

तुळशीविवाहाच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. तुळशी विवाह पूजा संध्याकाळी केली जाते. यापुजेसाठी एका पदरात कापड पसरून त्यामध्ये तुळशीचे रोप आणि शाळीग्राम बसवावे तसेच तुळशी आणि शाळीग्राममध्ये गंगाजल शिंपडाव. तसेच चौकीजवळ पाण्याने भरलेले फुलदाणी ठेवा आणि तुपाचा दिवा लावा. तुळशी आणि शाळीग्रामला रोळी आणि चंदनाचा तिलक लावावा. तसेच तुळशीच्या रोपाच्या भांड्यात उसाचा मंडप बनवा तुळशीच्या पानांना सिंदूर लावा, लाल चुणरी अर्पण करा आणि सिंदूर, बांगडी, बिंदी इत्यादी वस्तू बनवा. शालिग्राम हातात ठेऊन तुळशीची प्रदक्षिणा करावी आणि त्यानंतर आरती करावी. मग पूजा संपल्यानंतर हात जोडून तुळशीमाता आणि भगवान शालिग्रामला सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा.

वाचा: सामान्यांसाठी धमाकेदार ऑफर! एलपीजी गॅस बुक करून मिळवा 200 रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या कसा मिळेल बंपर डिस्काउंट

तुळशी विवाहाचे महत्व

आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व दिले आहे. या दिवशी विशेषत: विवाहित स्त्रीने पूजा आणि व्रत करावे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीजी आणि शाळीग्राम यांचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते आणि भक्ताच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. मग तुळशीविवाहानंतर विवाहाचा शुभ मुहूर्तही सुरू होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : When is Tulsi marriage; Then know the time of Tulsi marriage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button