Weather Update | शेतकऱ्यांनो राज्यात अवकाळी पावसाचा धोका! पुढच्या ३-४ तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार पाऊस
Farmers, danger of unseasonal rain in the state! Rain will lash these districts in the next 3-4 hours
Weather Update | मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी थंडीच्या कडाक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरण (Weather Update) निर्माण झाल्याने काही भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. येत्या ३-४ तासांत राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत पाऊस?
हवामान खात्याकडून मुंबई, रायगड, बीड, सातारा, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा ताशी वेग ३० ते ४० किमी असण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या
मुंबईत रविवारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा तयार झाला होता. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत उकाडा जाणवत होता. या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, पुढील दोन दिवस मुंबई, ठाण्यासह उपनगरात अवकाळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
वाचा : Weather update| महाराष्ट्राला येलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यात गारपिटीचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय; जाणून घ्या
अकाली पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. अवकाळी पावसामुळे रस्ते खराब होण्याची आणि वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
अकाली पावसाचे संभाव्य परिणाम
खरीप हंगामातील पिकांना नुकसान होऊ शकते. रस्ते खराब होऊ शकतात आणि वाहतूक विस्कळीत होऊ शकते. वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. पूर आणि भूस्खलन होऊ शकते.
Web Title: Farmers, danger of unseasonal rain in the state! Rain will lash these districts in the next 3-4 hours
हेही वाचा