
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे फळबागांमध्ये , द्राक्ष , टोमॅटो व मिरची पिकामध्ये बऱ्याच रोगाचे प्रादुर्भाव आढळून येत आहेत.
🌾🌾
अशा वातावरणामध्ये जिवाणूजन्य करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे करपा व झोंतोमानस या रोगाचा प्रसार (Spread of the disease)जास्त प्रमाणात होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क राहून होणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करावे याकरता कमी खर्चा मध्ये फवारणी योग्य ठरेल.
हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला जनतेशी संवाद! 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत घेतला मोठा निर्णय…..!
ब्ल्यू कॉपर:-
कॉपर ऑक्सिक्लोराइड 200 ग्रॅम .+ स्टेप्टोसायकलिन:- सल्फेट.ट्रेक्टासायक्लिंन हायड्रोक्लोराईड.90.10 (जंतूनाशक.)20 ग्रॅम.
औषधाचे कॉम्बिनेशन एकत्रित करून बंद बाटली मध्ये टोपण लावून झाकून ठेवावे नंतर 10 ते 15 मिनिटानंतर वापरण्यास घ्यावे.
🌾🌾 मॅंगनीज ( Manganese):-
पिकामधील मॅंगनीजची कमतरता भरुन काढते.
प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढवून अन्ननिर्मिती वाढते.
वाढीसाठी आवश्यक असणाऱ्यास ईंझाईम्सच्या निर्मितीसाठी चालना देते.
नायट्रोजनच्या चयापचयामध्ये म्हत्वाची भूमिका निभावते.
यातील पॉलिफॉस्फरस घटकांमुळे पिकांची प्रतिकारक शक्ती वाढते.
त्याच्या वापराने पानाची जाडी वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रियेला(photosynthesis) वेग येतो.
याच्या वापरामुळे अनावश्यक खते व औषधांच्या वापर कमी होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक खर्चात बचत होते.
🌾🌾
शेतामध्ये दरवर्षी कोणतेही पिक घेत असताना पिक पद्धतीत पिकाची फेरपालट करावी, कडधान्यांचा वापर करावा .
त्याचा पाला पाचोळा पडून जमिनीचे सेंद्रिय पदार्थांचे रुपांतर होते .
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खताचा (organic manure )भर द्यावा .
सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर सेंद्रिय खतांमध्ये मिसळून द्यावा माती परीक्षण अहवालानुसार.
हेही वाचा : आरोग्यवर्धक शेळीचे दूध: शेळीच्या दुधापासून ‘ हे ’ फायदे आहेत..
🌾 🌾 लोह कमतरता ओळखा ( iron deficiency)
नवीन पानावर लगेच जाणवते दोन शिरामधील पिवळा पडणे व शिरा मात्र हिरव्या ही लोह ची वैशिष्टपूर्ण लक्षणे आहेत.
जर काही वेळेत ऊपाय योजना केली नाही तर नंतरच्या काळात पूर्ण पान पाढंंरट पिवळे आणि काडीवर तपकीरे ठीपके येऊन पानांचे भाग सूकलेले दिसतात.
प्रभावीत भाग दूरवरुनही सहजपणे ओळखला जावू शकतो लोहकमतरता आसलेल्या झाडांची वाढ खुंटते आणी संभवत उत्पादन घट येते.वेळेतच ऊपाय योजना कराव्यात.
हे ही वाचा….
👉 मान्सून पाऊस सुरू झाला आहे ; पावसाळ्यामध्ये ‘जीवितहानी’ टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?
👉 पुढील पाच दिवस पावसाचे; ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करने टाळा – कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान…