महाराष्ट्रात टोमॅटो लागवडी खाली अंदाजे 29190 हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्टरी महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत. तीनही म्हणजे खरीप, रब्बी उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत
टोमॅटो पासून बनवण्यात येणारे पदार्थ:
टोमॅटोच्या पिकलेल्या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्युस इत्यादी पदार्थ बनविता येतात.
हवामान:
टोमॅटो हे उष्ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते. 12 तास स्वच्छ सुर्यप्रकाश आणि 60 ते 75 टक्के आर्द्रता असेल त्यावेळी टोमॅटो पिकाचे चांगले उत्पादन मिळते.
खरीप पीक कर्ज वाटप सुरू! पहा कसे असतील पिकानुसार कर्जाचे दर?
पिकासाठी लागणारी जमीन:
टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमिन लागवडी योग्य असते. हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्याचा निचरा चांगला होतो. आणि पिकांची वाढ चांगली होते. परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पवुरवठा करावा लागतो आणि वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते. जमिनीचा सामू मध्यम प्रतिचा म्हणजे 6 ते 8 असावा.
सुखद वार्ता: “या” कंपनीने बनवली कोरोना चाचणी चे किफायतीशीर किट, येणार फक्त शंभर रुपये खर्च…
सुधारित वाण:
पुसा रुबी, पुसा शीतल, पुसा गौरव,रोमा,रूपाली, वैशाली, भाग्यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली डवार्फ इ. जातीची लागवड केली जाते.
खते:
सरळ वाणांसाठी 200-100-100 व संकरीत वाणांसाठी 300-150-150 किलो नत्र, स्फूरद पालाश या प्रमाणात खत द्यावे. अर्धा नत्र लागवडीच्या वेळी व उरलेला लागवडीनंतर 40 दिवसांनी द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
उन्हाळयात टोमॅटो पिकाला पारंपारिक पध्दतीने पाणी दिल्यास 77 हेक्टर सेमी पाणी लागते. तर ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास 56 हेक्टर सेमी पाणी लागते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची 50 ते 55 टक्के बचत होऊन शकते.
केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!
रोग व्यवस्थापन:
भुरी:
पानावर पांढरी पावडर पद्लाय्सारखे दिसते. नंतर पाने पिवळी पडून वळतात. त्यासाठी थायोव्हीट ३० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डायनोकॅप ६ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
करापा रोग:
त्यासाठी ३५ ग्राम डायथेन एम-४५ हे औषध १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आठवड्याच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी. नत्राची आवश्यक इतकीच मात्र देणे.
रासायनिक खत वाढीमुळे शेतकऱ्यांचे,आर्थिक गणित कोलमडणार! वाचा सविस्तरपणे…
नागआळी:
डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि. ली. किंवा सायपरमेथ्रीन २५ टक्केप्रवाही ५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा:
1) शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…
2) भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…
3)बुलढाणा जिल्ह्यातील 300 वर्षाची परंपरा लाभलेली सुप्रसिद्ध भेंडवळ भाकीत काय सांगण्यात आली आहे “भविष्यवाणी”…