पुढील 24 तास थंडीची लाट कायम; उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडासह ही ठिकाणं भयानक गारठणार..
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड थंडी आपल्याला अनुभवायला मिळत आहे. सर्वात जास्त थंडी आहे ग्रामीण भागात. ग्रामीण भागात तर थंडीने कहरच केला आहे. मुंबई सारख्या भागात देखील प्रचंड थंडी वाढत आहे.
वाचा –
सध्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि विदर्भात पुढील 24 तास थंडीची लाट कायम असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. यावरून महाराष्ट्रात प्रचंड थंडी वाढतच चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबई सारख्या शहरात सुद्धा थंडीचा वेग वाढला आहे.
वाचा –
या ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत –
काही भागांमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सियसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ती ठिकाणे आहेत, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या जिल्ह्यातील किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात मोठी घट होणार असल्याने दिवसभर वातावरण थंड राहणार आहे. सतत गारठा राहणार असल्याचे माहिती हवामान खात्याने दिली आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा