Sugar Export | आता सध्या केंद्र सरकारने साखरेच्यानिर्यातीबाबत (Sugar Export) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारनं साखरेच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी निर्यातीवरील बंदी एक वर्षासाठी वाढवली आहे.
तसेच आता साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. पण मात्र, यातून काही देशांना सूट देखील देण्यात आली आहे. त्यामुळे आता युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील निर्यातीवर देखील निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. या दोन्ही ठिकाणी साखरेच्या निर्यातीला परवानगी असणार आहे. त्यामुळं देशात साखर महाग होणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं(agriculture information) आहे.
भारताची साखर निर्यात 57 टक्क्यांनी वाढली
आता भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. परंतु भारतातील साखरेच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच येत्या काही वर्षांत भारतातील ऊसाचे उत्पादन हे झपाट्याने वाढेल, अशी केंद्र सरकारची देखील अपेक्षा आहे. तसेच साखर उत्पादनात भारत हा जगात पहिले स्थान कायम ठेवले असेही सरकारनं म्हटलं(agriculture information) आहे. त्यामुळं भारताची साखर निर्यात 2021-22 मध्ये 57 टक्क्यांनी वाढून 109.8 लाख टन येवढी झाली आहे.
आता 31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी
आता सध्या केंद्र सरकारनं 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला होता. पण मात्र परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) आता एक वर्षासाठी मुदतवाढ देखील दिली आहे. आता 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी असणार आहे. तसेच परकीय व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी करुन याबाबतची माहिती दिली (agriculture information) आहे. कच्च्या, शुद्ध आणि पांढर्या साखरेच्या निर्यातीवरील निर्बंध 31 ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आले आहेत.
वाचा: शेतकर्यांना मिळणार दिवाळीच मोठं गिफ्ट ! या योजनेसाठी 90 टक्के अनुदान…
2021 ते 2022 मध्ये 394 लाख टन साखरेचं उत्पादन
आता युरोपियन युनियन (EU) आणि यूएस (US) मधील देशांमध्ये साखर निर्यात करता येणार आहे. परंतु त्यामुळं देशात साखरेच्या किंमती नियंत्रीत राहणार आहेत. तसेच या दोन बाजारपेठांमध्ये विशिष्ट प्रमाणात साखर निर्यात केली जाणार आहे. 2021 ते 2022 दरम्यान, देशात साखर कारखान्यांनी सुमारे 3 हजार 574 लाख टन ऊसाचं गाळप करुन सुमारे 394 लाख टन साखरेचं उत्पादन केले. तसेच यापैकी 359 लाख टन साखर कारखान्यांनी तयार केली. तर 35 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. परंतु या दरम्यान, परदेशात देखील साखर पाठवत राहिल्यास आपल्या देशात साखरेचा तुटवडा निर्माण होईल, असे केंद्र सरकारला वाटत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता साखर महागणार आहे. याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर देखील होईल. त्यामुळेच आता सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातल्याचे जाणकारांचे म्हणणे (agriculture information) आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- हवेत उडणाऱ्या बसच्या संकल्पनेनंतर; नितीन गडकरी करणार ई- हायवे; पेट्रोल डिझेलला करणार हद्दपार..
- शेतकऱ्यांना मिळणारं मोठं गिफ्ट! किमान आधारभूत किंमत मध्ये होणार ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ
Web title : Now Central government bans sugar export for one year