Farming Lifestyle | या शेतकऱ्याने खजूर आणि डाळिंब च्या शेती चां केला अनोखा प्रयोग ! जाणून घ्या कोणता आहे प्रयोग ?
Farming | आता अलीकडे सध्या भारतात शेती व्यवसायात (Farming) मोठी प्रगती बघायला मिळत आहे. शेतीमध्ये (Agriculture) आता नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि प्रयोगाचा देखील समावेश होत आहे. आता आपल्या देशातील अनेक शेतकरी हे बागायती पिकांच्या लागवडीसोबत नवनवीन शोध घेऊन देश-विदेशात आपल नाव कमवत आहेत. तसेच या शेतकऱ्यांना बागायती पिकातून चांगला नफा (Farmer Income) तर मिळत आहेच, पण शिवाय इतर शेतकऱ्यांनाही काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देखील मिळत आहे.
त्यामुळेच आता बहुतांश शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी (Traditional Crop) फळे, भाजीपाला, मसाले आणि औषधी पिकांसह सुक्या मेव्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी तर सेंद्रिय पद्धतीने फळबाग लागवड करून नवा विक्रम केला आहे. आता अशा शेतकऱ्यांच्या (Farmer) यादीत राजस्थानच्या केहराराम चौधरी यांचे देखील नाव सामील झाले आहे, त्यांनी 7 हेक्टरमध्ये खजूर आणि डाळिंबाची सेंद्रिय शेती (Organic Farming) करून तसेच परवडणाऱ्या खर्चात चांगला नफा कमावला आहे. यामुळे सध्या या अवलिया शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्याला मिळाली दूरदर्शन एका कार्यक्रमातून ही कल्पना
केहराराम चौधरी हे राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील दाता गावात सेंद्रिय शेती करतात. तसेच 2012 मध्ये केहराराम चौधरी यांनी एका टीव्ही कार्यक्रमातून प्रेरित घेऊन खजूराची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गुजरातमधील भुज येथे जाऊन तज्ज्ञांकडून त्याची माहिती घेतली, जिथे इस्रायली तंत्रज्ञानाने खजूर उत्पादन घेतले जात आहे.
त्याचवेळी केहराराम चौधरी यांनी बारी जातीच्या 312 रोपांची ऑर्डर दिली आणि अडीच वर्षांनी रोपांचा पुरवठा होताच त्यांनी 2 हेक्टर शेतात खजुराची सेंद्रिय शेती सुरू केली. याआधी देखील केहराराम चौधरी यांनी डाळिंबाची बागायती करून खूप चांगले उत्पादन घेतले होते. बागायती पिकांच्या लागवडीसोबतच हे मारवाडी शेतकरी आज गहू, बाजरी, मूग, माठ, एरंड, रायडा या पारंपरिक पिकांचे उत्पादनही घेत आहेत.
मायदेशासाठी सोडली परदेशातील नोकरी, आता ड्रॅगन फ्रूट पिकवून कमावतोय लाखो रुपये
किफायतशीर शेतीतून झाला लाखोंचा नफा
सुरुवातीपासूनच केहराराम चौधरी यांनी खजुराची शेती किफायतशीर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी रासायनिक खताऐवजी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच केहराराम यांनी वनस्पतींच्या पोषण व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीचा देखील वापर केला. त्यामुळे हळूहळू सेंद्रिय शेतीतून नफा वाढू लागला, त्यानंतर त्यांनी 2 हेक्टरवर पसरलेली खजूराची लागवड ही 4 हेक्टरपर्यंत वाढली आणि बारी जातीबरोबरच मेडजूल जातीची खजूर वाढू लागले. तसेच एका झाडापासून सुमारे 100 किलो खजूर तयार होत असून ते 1000 रुपये किलो दराने बाजारात विकले जात असल्याचे केहराराम सांगतात. त्यांची खजूरबाग दरवर्षी 21,200 किलो खजुराचे उत्पादन करते आणि त्यांना वार्षिक उत्पन्न हे 30 लाख रुपये पर्यंत मिळवून देते. त्यांनी खजुराची सेंद्रिय शेती करून आतापर्यंत 3 कोटी 12 लाखांपर्यंत कमाई केली आहे.
वाचा :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 5 वर्षानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
त्यांनी डाळिंब लागवड देखील केली यशस्वी
केहराराम चौधरी हे आता सुमारे 7 हेक्टर जमिनीवर गहू, बाजरी, मूग, पतंग, एरंड आणि रायडा, खजूर आणि तृणधान्ये घेत आहेत. 600 खजुरांची लागवड करण्यापूर्वी त्यांनी 2009 मध्ये 2500 डाळिंबाची (pomegranate farming) रोपे लावली होती. त्यांच्या 3 हेक्टर जमिनीवर पसरलेल्या डाळिंबाच्या बागांमध्ये प्रति झाड सुमारे 25 ते 30 किलो उत्पादन मिळते, जे 70 ते 80 रुपये किलो दराने विकले जाते. तसेच यांच्या शेतात पिकवलेले डाळिंब हे राज्यवार मंडईत निर्यात केले जातात. त्यातून वार्षिक उत्पन्न हे 40 ते 42 लाख रुपये येवढे मिळत आहे. आज केहराराम चौधरी यांनी पारंपारिक पिकांसोबत बागायती पिकांचे देखील उत्पादन घेऊन, नवनवीन शोधांचा अवलंब करून प्रगत शेतीमध्ये बरेच काही करता येते हे त्यांनी सिद्ध केले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- सोयाबीनची नवीन जात विकसित! करणार पाण्याचा ताण सहन अन् प्रति हेक्टरी मिळणारं ‘इतके’ उत्पादन
- शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणा नवा ट्रॅक्टर! सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ
Web title : A Rajasthan farmer did a unique experiment in his farm! So know what this new experiment is all about